"परिनिरीक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Wikiquote कडून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १४७: ओळ १४७:
*... इतिहासाला पूर्णविराम ठाऊक नाही. आद्य शंकराचार्यांनी परमेश्वराला देखील 'गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी' असं म्हटलंय. या गतिमान जीवनात वाङ्मयसुद्धा प्रगतच होत रहाणार. तेव्हा नव्या प्रतिमा, नवे शब्द, नवे अविष्कार, नवे विषय आले, तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. त्यातलं अस्सल असेल तेच टिकेल. आणि बाकीचं कालाच्या प्रवाहात वाहून जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. कारण निर्मळ मनाने वाचणाऱ्याला साहित्यात जीवनाचं दर्शन कुठे घडतंय आणि नुसतंच प्रदर्शन कुठे मांडलं गेलंय हे बरोबर कळतं. नव्या युगातल्या नव्या अनुभूतींचं दर्शन हे सौंदर्यासंबंधीच्या नितीविषयीच्या वगैरे जुन्या रुढ कल्पनांशी कधी कधी जुळणारं नसेलही. मग तसल्या लेखनाच्या आड आपल्या नितीमत्तेच्या संरक्षणाची सबब सांगून शासन येईल. विद्यापीठातले पोटार्थी प्राध्यापक आणि विकत घेतलेले पत्रकार त्यांना साथ देतील. म्हणून लेखक जर दुरितांचे तिमीर जावो या भावनेने त्याला जाणवलेले सत्य कलापूर्ण स्वरुपात मांडत असेल, तर 'जो जे वांछील तो ते लाहो' च्या ठिकाणी 'जो जे वांछील तो ते लिहो' अशी आपली धारणा पाहिजे. माणसाच्या सुकृती इतकीच माणासातली विकृती हे ही एक सत्य आहे. अश्या विकृतीची चित्रे साहित्यात आता ह्या विज्ञानयुगात येणं अपरिहार्य आहे. वैज्ञानिक बुद्धीला आपल्या चुका कबूल करायला संकोच वाटत नाही. पण जो जे वांछील तो ते लिहो म्हटल्यावर लगेच आपल्यापुढे माणसांच्या वासना चाळवणारे त्यांच्यातल्या द्वेषभावनांना प्रोत्साहन देणारे असे लिखाण उद्या अधिकाधिक प्रमाणात लिहिले गेले तर त्याचे काय करायचे? हा प्रश्न उभा राहिल ! हे लेखक समाज रसातळाला नेणारे लेखन करतील या भितीचा बागुलबुवा उभा करुनच सरकार सेंसॉर बोर्ड वगैरे स्थापन करीत असते. आणि संस्कृतीसंरक्षणाचा झेंडा घेऊन स्वत:ची संस्कृती तीच खरी संस्कृती असे मानणारे लोक अस्तन्या वर करुन पुढे सरसावतात. साहित्याने पिढी बिघडवण्याची भाषा तर प्रत्येक पिढीत चालू आहे. मार्क ट्वेन ह्या विनोदी लेखकाचे यंग टॉम सॉयर हे शाळकरी वयातल्या पोरांच्या खोडकर लिलांचे अतिशय मजेदार दर्शन घडविणारे पुस्तक आहे. ते वाचून मुले बिघडतील म्हणून अमेरिकेतल्या एक-दोन संस्थानांतल्या संस्कृतीसंरक्षक सरकारांनी त्यांच्यावर बंदी आणली होती. इंग्लिश संस्कृतीसंरक्षकांनी शॉ च्या पिग्मॅलियन नाटकात नुसता डॅम हा शब्द आल्यामुळे सगळी संस्कृती रसातळाला चालली आहे असे समजून नाटक करणाऱ्यांना किती छळले यावर एक ग्रंथ लिहिला गेला आहे. मराठी भाषेत एके काळी संततिनियमन हा शब्द मोठ्याने उच्चारायची भिती होती. त्यासाठी शकुंतलाबाई परांजपे आणि र. धो. कर्वे यांचा किती छळ झाला होता! आता प्राथमिक शाळांच्या भिंतीवर आतल्या बाजूने शिवाजी महाराजांचा फोटो असतो आणि बाहेरच्या बाजूला निरोधची सरकारी जाहिरात असते. म्हणजे एका बाजूला इतिहासाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला भविष्य सुखाचा जावो म्हणून दिलेला सावधगिरीचा इशारा! आता छत्रपतींच्या मुळे मुलांच्यातली नुसतीच पूर्वजपूजा वाढेल म्हणून ती तसबीर काढून टाकायची की संततीप्रतिबंधक उपायांचे ज्ञान फार लवकर झाले तर पोरांची निती बिघडेल म्हणून जाहिरातीवर डांबर फासायचे? दोन्ही करण्याची आवश्यकता नाही. भिंतीच्या या दोन्ही बाजू सुबुद्धपणाने पहाता कशा येतील याची दृष्टी समजाला मिळणे हे इथे आवश्यक आहे.,<ref>[[पु.ल. देशपांडे]] 'इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४: अध्यक्षीय भाषणातून </ref>
*... इतिहासाला पूर्णविराम ठाऊक नाही. आद्य शंकराचार्यांनी परमेश्वराला देखील 'गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी' असं म्हटलंय. या गतिमान जीवनात वाङ्मयसुद्धा प्रगतच होत रहाणार. तेव्हा नव्या प्रतिमा, नवे शब्द, नवे अविष्कार, नवे विषय आले, तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. त्यातलं अस्सल असेल तेच टिकेल. आणि बाकीचं कालाच्या प्रवाहात वाहून जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. कारण निर्मळ मनाने वाचणाऱ्याला साहित्यात जीवनाचं दर्शन कुठे घडतंय आणि नुसतंच प्रदर्शन कुठे मांडलं गेलंय हे बरोबर कळतं. नव्या युगातल्या नव्या अनुभूतींचं दर्शन हे सौंदर्यासंबंधीच्या नितीविषयीच्या वगैरे जुन्या रुढ कल्पनांशी कधी कधी जुळणारं नसेलही. मग तसल्या लेखनाच्या आड आपल्या नितीमत्तेच्या संरक्षणाची सबब सांगून शासन येईल. विद्यापीठातले पोटार्थी प्राध्यापक आणि विकत घेतलेले पत्रकार त्यांना साथ देतील. म्हणून लेखक जर दुरितांचे तिमीर जावो या भावनेने त्याला जाणवलेले सत्य कलापूर्ण स्वरुपात मांडत असेल, तर 'जो जे वांछील तो ते लाहो' च्या ठिकाणी 'जो जे वांछील तो ते लिहो' अशी आपली धारणा पाहिजे. माणसाच्या सुकृती इतकीच माणासातली विकृती हे ही एक सत्य आहे. अश्या विकृतीची चित्रे साहित्यात आता ह्या विज्ञानयुगात येणं अपरिहार्य आहे. वैज्ञानिक बुद्धीला आपल्या चुका कबूल करायला संकोच वाटत नाही. पण जो जे वांछील तो ते लिहो म्हटल्यावर लगेच आपल्यापुढे माणसांच्या वासना चाळवणारे त्यांच्यातल्या द्वेषभावनांना प्रोत्साहन देणारे असे लिखाण उद्या अधिकाधिक प्रमाणात लिहिले गेले तर त्याचे काय करायचे? हा प्रश्न उभा राहिल ! हे लेखक समाज रसातळाला नेणारे लेखन करतील या भितीचा बागुलबुवा उभा करुनच सरकार सेंसॉर बोर्ड वगैरे स्थापन करीत असते. आणि संस्कृतीसंरक्षणाचा झेंडा घेऊन स्वत:ची संस्कृती तीच खरी संस्कृती असे मानणारे लोक अस्तन्या वर करुन पुढे सरसावतात. साहित्याने पिढी बिघडवण्याची भाषा तर प्रत्येक पिढीत चालू आहे. मार्क ट्वेन ह्या विनोदी लेखकाचे यंग टॉम सॉयर हे शाळकरी वयातल्या पोरांच्या खोडकर लिलांचे अतिशय मजेदार दर्शन घडविणारे पुस्तक आहे. ते वाचून मुले बिघडतील म्हणून अमेरिकेतल्या एक-दोन संस्थानांतल्या संस्कृतीसंरक्षक सरकारांनी त्यांच्यावर बंदी आणली होती. इंग्लिश संस्कृतीसंरक्षकांनी शॉ च्या पिग्मॅलियन नाटकात नुसता डॅम हा शब्द आल्यामुळे सगळी संस्कृती रसातळाला चालली आहे असे समजून नाटक करणाऱ्यांना किती छळले यावर एक ग्रंथ लिहिला गेला आहे. मराठी भाषेत एके काळी संततिनियमन हा शब्द मोठ्याने उच्चारायची भिती होती. त्यासाठी शकुंतलाबाई परांजपे आणि र. धो. कर्वे यांचा किती छळ झाला होता! आता प्राथमिक शाळांच्या भिंतीवर आतल्या बाजूने शिवाजी महाराजांचा फोटो असतो आणि बाहेरच्या बाजूला निरोधची सरकारी जाहिरात असते. म्हणजे एका बाजूला इतिहासाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला भविष्य सुखाचा जावो म्हणून दिलेला सावधगिरीचा इशारा! आता छत्रपतींच्या मुळे मुलांच्यातली नुसतीच पूर्वजपूजा वाढेल म्हणून ती तसबीर काढून टाकायची की संततीप्रतिबंधक उपायांचे ज्ञान फार लवकर झाले तर पोरांची निती बिघडेल म्हणून जाहिरातीवर डांबर फासायचे? दोन्ही करण्याची आवश्यकता नाही. भिंतीच्या या दोन्ही बाजू सुबुद्धपणाने पहाता कशा येतील याची दृष्टी समजाला मिळणे हे इथे आवश्यक आहे.,<ref>[[पु.ल. देशपांडे]] 'इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४: अध्यक्षीय भाषणातून </ref>
**[[पु.ल. देशपांडे]] 'इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४: अध्यक्षीय भाषणातून
**[[पु.ल. देशपांडे]] 'इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४: अध्यक्षीय भाषणातून

*राहता राहिला प्रश्न तो स्वातंत्र्याचा स्वैराचार होण्याच्या शक्यतेचा. हा धोका नक्कीच आहे. हा धोका टाळण्यासाठी काही विषयांवर बंदी घालणे; काही भाषेस आक्षेप घेणे; एखाद्या संघटनेने दायित्व स्वीकारणे; एका सेन्सॉर बोर्डाने यासाठी काम करणे असे प्रकार आहेतच. तत्त्व म्हणून हे मान्य होण्यासारखे आहे. पण एकदा का हे तत्त्व म्हणून स्वीकार केले की कोठे थांबायचे हे समजू शकत नाही. ज्यांनी तत्त्व म्हणून हा विषय तारतम्याने मांडला ते कदाचित योग्य ती दिशा दाखवतील देखील. परंतु दुर्दैवाने बऱ्याचदा गोष्टी त्यांच्या हातात राहत नाहीत. वाघावर स्वार होता येते, पण उतरता येत नाही. अतिरेकी बंधने, सूत्रांचे कर्मठ अर्थ, फतवे यांच्यामध्ये हे मूळ तत्त्व गुरफटून जाते. टोकाच्या भूमिका लादणारे सत्यानाशच करून टाकतात असे दिसते. हिंदू धर्म यांस अपवाद राहील असा आशावाद, युक्तिवाद केला जातो. पण दुर्दैवाने तोही तितकासा खरा नाही. एकूणच नियंत्रणातून मिळणारे फायदे काही असलेच तर तुलनेने खूपच अल्पायुषी आहेत.<ref>
*राहता राहिला प्रश्न तो स्वातंत्र्याचा स्वैराचार होण्याच्या शक्यतेचा. हा धोका नक्कीच आहे. हा धोका टाळण्यासाठी काही विषयांवर बंदी घालणे; काही भाषेस आक्षेप घेणे; एखाद्या संघटनेने दायित्व स्वीकारणे; एका सेन्सॉर बोर्डाने यासाठी काम करणे असे प्रकार आहेतच. तत्त्व म्हणून हे मान्य होण्यासारखे आहे. पण एकदा का हे तत्त्व म्हणून स्वीकार केले की कोठे थांबायचे हे समजू शकत नाही. ज्यांनी तत्त्व म्हणून हा विषय तारतम्याने मांडला ते कदाचित योग्य ती दिशा दाखवतील देखील. परंतु दुर्दैवाने बऱ्याचदा गोष्टी त्यांच्या हातात राहत नाहीत. वाघावर स्वार होता येते, पण उतरता येत नाही. अतिरेकी बंधने, सूत्रांचे कर्मठ अर्थ, फतवे यांच्यामध्ये हे मूळ तत्त्व गुरफटून जाते. टोकाच्या भूमिका लादणारे सत्यानाशच करून टाकतात असे दिसते. हिंदू धर्म यांस अपवाद राहील असा आशावाद, युक्तिवाद केला जातो. पण दुर्दैवाने तोही तितकासा खरा नाही. एकूणच नियंत्रणातून मिळणारे फायदे काही असलेच तर तुलनेने खूपच अल्पायुषी आहेत.<ref>
[http://www.manogat.com/node/5677 manogat प्रेषक एकलव्य (रवि., १४/०५/२००६ - १७:४६)] page as seen on 29 June 2010</ref>
[http://www.manogat.com/node/5677 manogat प्रेषक एकलव्य (रवि., १४/०५/२००६ - १७:४६)] page as seen on 29 June 2010</ref>
** manogat प्रेषक एकलव्य (रवि., १४/०५/२००६ - १७:४६)] page as seen on 29 June 2010
** manogat प्रेषक एकलव्य (रवि., १४/०५/२००६ - १७:४६)] page as seen on 29 June 2010


===सोवळ्यातलं सेन्सॉर बोर्ड===
Aug 17, 2014, 12.00AM IST <ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/40317428.cms</ref>


* जे लोकांना आवडणार नाही, आक्षेपार्ह वाटेल ते लोक बघणार नाहीत. पण त्या नाटकावरच बंदी आणा, असं सांगणारं सेन्सॉर बोर्ड कोण? जयंत पवार


* रंगभूमी ही पवित्र जागा असून तिचं मांगल्य जपलं पाहिजे, अशी चुकीची धारणा पूर्वापार नाटक करणाऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे. वास्तविक कलेच्या क्षेत्रात मंगल, पवित्र या मूल्यांना काही थारा नाही. किंबहुना या मूल्यांच्या अतिरेकामुळे कलेच्या वाढीलाच धोका पोचतो. कला ही सत्याचा सौंदर्याच्या अंगाने शोध घेते. तिथे शिव या तत्त्वाचा उपयोग नसतो. पण हे न उमगल्याने (वा मान्य नसल्याने) अनेक सदस्य स्वयंघोषित नीतिरक्षक बनतात आणि 'मोराल पोलिसिंग' करू लागतात. त्यांना हा आपला सरकारदत्त अधिकार वाटतो आणि हट्टाग्रहातून येणाऱ्या गंडापायी ते नाट्यसंहितांवर कात्री चावलून आपल्या हिंसक कृतीचं समर्थन करत राहतात. यात अनेक कलावंत असतात, जे अडाणीपणातून कलेच्याच मुळावर येतात. याचा फटका नाट्यकृतीकडे गंभीरपणे पाहणाऱ्या लेखक-कलावंतांनाच होतो.


* '''नाटकातली शिवराळ वा तथाकथित अशिष्ट भाषा सेन्सॉर बोर्डाला खटकत असेल तर बोर्डाच्या संवेदनशीलतेत आणि समजशक्तीत काहीतरी कमतरता आहे, असं समजायला हवं.''' प्रमाणभाषेची बंधनं झुगारून विविध समाजगट आपल्या अस्सल भाषेतून आपले अनुभव साहित्यातून, नाटक आणि चित्रपटातून व्यक्त करू लागल्यालाही आता बराच काळ झाला आहे. हे साहित्य आणि कला समाजही एका समजदारीने पचवतो आहे. ही भाषा व्यक्त करण्यामागची कळकळ, प्रामाणिकपणा आणि ती मांडणाऱ्याचा कलेमागचा हेतू तपासला पाहिजे. त्यात अस्सलपणा असेल तर कुठलीच गोष्ट कुणालाही खटकण्याचं प्रयोजनच उरत नाही. सर्वसाधारण समाजाला तो अनुभव, ती भाषा परकी असेल तर ती स्वीकारून प्रगल्भ होण्याची शहाणीव समाजापाशी असते, यावर विश्वास ठेवला पाहिजे. नाटक करणाऱ्याला त्याच्या भाषेत बोलू द्या, तुमचे आग्रह वा सक्ती त्याच्यावर लादू नका, असं आता सरकारनेच आपल्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांना सांगण्याची गरज निर्माण झाली आहे.


==संदर्भ==
==संदर्भ==

१७:२६, २६ नोव्हेंबर २०१४ नुसारची आवृत्ती

५0px
ह्या लेखाचा/विभागाचा [[साचा:अनुवादभाषा]] भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.पहा
कृपया, खालील भाषांतर संकेतांचे पालन करा.
  • विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शिर्षके इंग्रजीतच असणे अभिप्रेत आहे.
  • एकुण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असु नयेत असा संकेत आहे.
  • स्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.


विकिक्वोट
विकिक्वोट
Look up परिनिरीक्षण in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
परिनिरीक्षण हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा

सेंसॉरशीप बद्दलची अवतरणे.

  • " जेव्हा कुणालाही कुणीही न-वाचणारी पुस्तके सोडून इतर कोणतीही पुस्तके वाचू दिली जात नाहीत तेव्हा अभ्यवेक्षण तात्विक पूर्णत्वास येते "Censorship ends in logical completeness when nobody is allowed to read any books except the books that nobody reads."
  • "कुणालाही सद्य संकल्पनांना संस्थात्मकतेला आवाहन देण्या पासून प्रतिबंधित करण्याकरताच सर्व अभ्यवेक्षण अस्तीत्वात असतात.सर्व विकासाची रूजवात सद्य संकल्पनांना आवाहन देऊन आणि सद्य संस्थात्मकतेस supplanting करून होत असते.परिणामी विकासाची पहिली अट अभ्यवेक्षणाचे निर्मुलन (removal of censorship) आहे. "All censorships exist to prevent anyone from challenging current conceptions and existing institutions. All progress is initiated by challenging current conceptions, and executed by supplanting existing institutions. Consequently the first condition of progress is the removal of censorship."


  • "Censorship ends in logical completeness when nobody is allowed to read any books except the books that nobody reads."
  • "All censorships exist to prevent anyone from challenging current conceptions and existing institutions. All progress is initiated by challenging current conceptions, and executed by supplanting existing institutions. Consequently the first condition of progress is the removal of censorship."
  • समाजाचा स्वत:वरील विश्वासाचा अभाव अभ्यवेक्षणाद्वारे प्रतिबिंबित होतो.
  • "इंटरनेट सेसोरशिपला दोष समजते आणि त्याला वळसा घालून पुढे जाते.

साचा:खालील भाषांतर व्यवस्थीत तपासून आणि सुधारून हवे आहे

  • पुस्तक जाळण्याचे एकापेक्षा अधिक मार्ग आहेत, आणि हे जग जळत्या आगकाड्या घेऊन पाळणाऱ्या लोकांनी भरलेले आहे. प्रत्येक अल्पसंख्यांक, मग तो... असा कुणीही असो, त्याला असे वाटते की, केरोसीन ओतून पेटवण्याची, ठिणगी लावण्याची इच्छाशक्ती, हक्क आणि कर्तव्य आपल्यापाशीच आहे. स्वतःला कंटाळवाणे, लापशीसारखा बेचव, सपक आणि शुष्क साहित्याचा स्त्रोत समजणारा प्रत्येक मूर्ख संपादक हा, कुजबुजण्यापेक्षा मोठ्या आवाजात बोलणार्‍या किंवा लहान मुलांच्या बडबड गीता पेक्षा अधीक लिहिणार्‍या प्रत्येक लेखकाच्या मानगुटावर नजर रोखून असतो आणि शीरच्छेदकरण्याचे यंत्र चाटून साफ ठेवतो.


<! -- "There is more than one way to burn a book. And the world is full of people running about with lit matches. Every minority, be it Baptist/Unitarian, Irish/Italian/Octogenarian/Zen Buddhist, Zionist/Seventh-day Adventist, Women's Lib/Republican, Mattachine/FourSquareGospel feels it has the will, the right, the duty to douse the kerosene, light the fuse. Every dimwit editor who sees himself as the source of all dreary blanc-mange plain porridge unleavened literature, licks his guillotine and eyes the neck of any author who dares to speak above a whisper or write above a nursery rhyme." -->


  • "केवळ सहा आठवडे आधी, मला शोध लागला, गेली कित्येक वर्षे, बॅलंटाईन बूक्सचे काही शांत बदीस्त संपादकांनी तरूण पिढी बिघडण्याच्या भितीने एकएक करून कादंबरीतील जवळपास ७५ उतारे सेंसॉर केले(वगळले). विद्यार्थ्यांनी , ती कादंबरी भविष्यातील सेंसॉरशीप आणि पुस्तक जाळण्याबद्दल होती हा सर्वोत्तम कसा सर्वोत्तम विरोधाभास ते मला लिहून कळवले.या उन्हाळ्यात ज्युडी लीन डेल रे,हा नवीन बॅलेंताईन संपादक सर्व तथाकथित तिरस्कृत जागा वापस भरून संपूर्ण पुस्तक पूर्वस्थितीत पुर्नप्रकाशित करत आहे."
  • "Only six weeks ago, I discovered that, over the years, some cubby-hole editors at Ballantine Books, fearful of contaminating the young, had, bit by bit, censored some 75 separate sections from the novel. Students, reading the novel which, after all, deals with the censorship and book-burning in the future, wrote to tell me of this exquisite irony. Judy-Lynn Del Rey, one of the new Ballantine editors, is having the entire book reset and republished this summer with all the damns and hells back in place."


  • "संगीनी धारी सैनिक आणि दंडूका घेतलेल्या पोलिसांसमवेत पेडेस्टलवर बसलेले हुकुमशहा तुम्ही पहात असता.पण त्यांच्या मनात न बोललेली -नबोलण्यासारखी! भिती असते.त्यांना शब्द आणि विचारांची भिती वाटते!परदेशात बोललेले शब्द, घरी घोंघावणारे विचार, अधिक शक्तिमान असतात कारण ते प्रतिबंधीत असतात.त्यांनी त्यांना घाबरे सुटते.एक छोटा उंदीर- एक छोटा उंदीर! विचारांचा खोलीत शीरतो आणि मग प्रबळ सामर्थ्य्शाली सत्ताधीशांची सुद्धा घबराट उडते."
  • "You see these dictators on their pedestals, surrounded by the bayonets of their soldiers and the truncheons of their police. Yet in their hearts there is unspoken - unspeakable! - fear. They are afraid of words and thoughts! Words spoken abroad, thoughts stirring at home, all the more powerful because they are forbidden. These terrify them. A little mouse - a little tiny mouse! -of thought appears in the room, and even the mightiest potentates are thrown into panic."



  • "पुस्त्कक जाळणार्‍यांना सामील नका होऊ.ते कधी अस्तीत्वात होते याचा पुरावा दडवून तुम्ही ते विचार दडवू शकता असे समजू नका."
  • "Don't join the book burners. Don't think you are going to conceal thoughts by concealing evidence that they ever existed."
  • "जर मानवी शरीर अश्लील असेल तर त्याची तक्रार निर्मात्याकडे करा माझ्या कडे नको" "If the human body's obscene, complain to the manufacturer, not to me."
  • "जे तात्पुरत्या सुरक्षेकरिता स्वतःचे स्वातंत्र्य घालवतात ते ना स्वातंत्र्यास पात्र असतात ना सुरक्षीततेकरिता" "They that can give up essential liberty to obtain a little temporary safety deserve neither liberty nor safety."


  • "If all printers were determined not to print anything till they were sure it would offend nobody, there would be very little printed."
  • "Our liberty depends on the freedom of the press, and that cannot be limited without being lost."
  • "पुस्तके प्रतिबंधीत राहू शकत नाहीत.ती जळत नाहीत.संकल्पना तुरूंगात जाऊ शकत नाहीत. इतिहासाच्या लांब प्रवासात सेंसॉर आणि inquisitor नेहमीच हरले आहेत.वाईट विचारांच्या (संकल्पनांच्या) विरूद्ध चांगले विचार (संकल्पना) हा एकच विश्वासार्ह मार्ग आहे.चांगल्या संकल्पनांचा(विचारांचा) स्रोत स्वातंत्र्य आहे.बुद्धीमत्तेचा विश्वासार्ह मार्ग मुक्त शिक्षण आहे"

"Books won't stay banned. They won't burn. Ideas won't go to jail. In the long run of history, the censor and the inquisitor have always lost. The only sure way against bad ideas is better ideas. The source of better ideas is freedom. The surest path to wisdom is liberal education."

  • "जिथे त्यांनी पुस्तके जाळली,तीथे मानसे जाळून त्यांचा शेवट होईल."
  • "Where they have burned books, they will end in burning human beings."


  • "आणि सेंसॉरकडे कोणतीही चांगले काल्पनिक कथानक येऊ द्या आणि वाईट नाकारू द्या मग काल्पनिक वाडमय किंवा साहित्यवर सेंसॉरशीप लादणे हि पहिली गोष्ट राहील, आणि आम्ही माता आणि दाईंनी त्यांच्या मुलांना जे अधिकृत आहे तेच सांगण्याची इच्छा आम्ही बाळगू"
  • "Then the first thing will be to establish a censorship of the writers of fiction, and let the censors receive any tale of fiction which is good, and reject the bad; and we will desire mothers and nurses to tell their children the authorized ones only."


  • " ...... यूद्ध्काळात केलेली (बातम्यांची सेंसॉरशीप), जाणीवपूर्वक पेरलेल्या "गैरमाहिती"चा भलामोठा प्रचार .... आता जे येत आहे ते पाहिले तर, विसाव्या शतकाचे शेवटचे अर्धशतक गर्भश्रीमंतमुलांची वाईल्ड पार्टी वाटेल..यूद्ध्काळातील हे सर्व साधारण वर्तन आहे- सर्व देश आणि योद्ध्यांकरिता- आणि ज्या लोकांना खर्‍या बातमीचे मुल्य समजते त्यांचे जीणे दुर्धर करते.
  • "The last half of the 20th century will seem like a wild party for rich kids, compared to what's coming now. The party's over, folks. . . [Censorship of the news] is a given in wartime, along with massive campaigns of deliberately-planted "Dis-information". That is routine behavior in Wartime— for all countries and all combatants— and it makes life difficult for people who value real news."
  • "सेंसॉरशीप म्हणजे एखाद्या माणसाला, एखादे बाळ चावू शकत नाही म्हणून जेवणाचा तुकडा न देण्या सारखे आहे."
  • "Censorship is telling a man he can't have a steak just because a baby can't chew it."
  • "सत्य हे आहे की, वाचनालय माझे एखादे पुस्तक हद्दपार करते आणि आक्षेपार्ह भाग काढून न सुधारलेले बायबल त्याची जागा घेऊन असुरक्षीत तरून आणि वयाच्या लोकांच्या हाती जाते तेव्हा खोलवर बेशुद्ध विरोधाभास मला राग आणत नाही प्रसन्न करतो.
  • "But the truth is, that when a Library expels a book of mine and leaves an unexpurgated Bible lying around where unprotected youth and age can get hold of it, the deep unconscious irony of it delights me and doesn't anger me."
    • Mark Twain, Letter to Mrs. F. G. Whitmore (7 February 1907)


  • "तुमच्या गालणीतून सुटणार्‍या अब्जावदी अश्लील संकेतस्थळांची काळजी करू नका, उपहास करणारी संकेतस्थळे हे तुमचे प्राथमिक लक्ष्य असले पाहिजे, ........ . मुलांवर लक्ष ठेवण्याची काळजी न घेणारे बेजबाबदार पालक तुम्हाला धन्यवाद देतील.
  • "In the mean time, don't worry about the millions of hardcore bukkake, gang-bang, and rape sites your filters miss, satire sites should be your top priority. Irresponsible parents who can't be bothered with supervising their children will thank you for it."


  • "एकमेव वाईट अश्लील शब्द म्हणजे सेंसॉ्रशीप बोर्ड(FCC) होय"
  • "The only bad F-word is FCC."
  • "नितीमान किंवा अनितीमान अशी कणतीही गोष्ट अस्तीत्वात नाही .पुस्तके चांगली लिहिलेली असतात किंवा खराब लिहिलेली असतात. एवढेच"
  • "There is no such thing as a moral book or an immoral book. Books are well written or badly written. That is all."
  • " जग ज्या पुस्तकांना अनितीमान म्हणते असते कि जी जगास त्याची स्वत:चीच लज्जा दाखवत असतात"
  • "The books that the world calls immoral are the books that show the world its own shame."
  • "जी कल्पना धोकाधायक नसेल ती कल्पना म्हणवण्याच्या लायकीचीच रहात नाही."
  • "An idea that is not dangerous is unworthy of being called an idea at all."
  • " मुलांना हवे ते वाचू द्या त्यानंतर त्यांच्याशी त्या ब्द्दल चर्चा करा. जर पालक आणि मुले परस्परांशी संवाद साधू शकले तर आपल्याकडे तेवढी सेंसॉरशीप राहणार नाही कारण आपणास तेवडःई भिती नसेल."
  • "Let children read whatever they want and then talk about it with them. If parents and kids can talk together, we won't have as much censorship because we won't have as much fear."
  • "हे सेंसॉर करा"
  • "Censor this!"
  • "आता जे पुस्तक जळतणावर आहे त्याची मला कालजी वाटत नाही.अशी पुस्तके की जी कधीच लिहीली जानार नाहीत.जी पुस्तके कधी वाचलीच जाणार नाहीत.आणि सर्व सेंसॉरशीपच्या भितीने.नेहमी प्रमाणे,तरूण वाचकवर्गाचा यात खरा मोठा तोटा असणार आहे.
  • "It's not just the books under fire now that worry me. It is the books that will never be written. The books that will never be read. And all due to the fear of censorship. As always, young readers will be the real losers."


  • Wikipedia.com सर्व प्रकारच्या माहितीकरिताचा उत्कृष्ट स्रोत हा या पुढे सत्यास वाहीला आहे असे म्हणता येत नाही,कधी काळी तो होता असे गृहीत धरले तरीही.((रलेले भाषाम्तरीत करून हवे आहे.
  • It seems that Wikipedia.com, that splendid source for all kinds of information, is no longer dedicated to the truth, assuming it ever was.
    Individuals who have tried to edit the pages about Barack Obama — to reflect the incontrovertible fact that he is not God, Abraham Lincoln, Franklin Roosevelt, or Ronald Reagan — report that their contributions have vanished within minutes of posting them, and that they, themselves, have been suspended for three days following each 'infraction'.
    When some sort of official at Wikipedia was contacted about this, she stonewalled, claiming that this censorship was the work of 'volunteers', implying they were somehow beyond control of Wikipedia itself.
    Like the Red Guard and the Khmer Rouge were 'volunteers'.
    • L. Neil Smith, "Announcifications From Your Publicatorialist: Wikipedia, Missouri, and Ceres,"[१] (15 March 2009)

भारतीय अथवा मराठी विचारवंत

जो जे वांछील तो ते लिहो

  • ... इतिहासाला पूर्णविराम ठाऊक नाही. आद्य शंकराचार्यांनी परमेश्वराला देखील 'गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी' असं म्हटलंय. या गतिमान जीवनात वाङ्मयसुद्धा प्रगतच होत रहाणार. तेव्हा नव्या प्रतिमा, नवे शब्द, नवे अविष्कार, नवे विषय आले, तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. त्यातलं अस्सल असेल तेच टिकेल. आणि बाकीचं कालाच्या प्रवाहात वाहून जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. कारण निर्मळ मनाने वाचणाऱ्याला साहित्यात जीवनाचं दर्शन कुठे घडतंय आणि नुसतंच प्रदर्शन कुठे मांडलं गेलंय हे बरोबर कळतं. नव्या युगातल्या नव्या अनुभूतींचं दर्शन हे सौंदर्यासंबंधीच्या नितीविषयीच्या वगैरे जुन्या रुढ कल्पनांशी कधी कधी जुळणारं नसेलही. मग तसल्या लेखनाच्या आड आपल्या नितीमत्तेच्या संरक्षणाची सबब सांगून शासन येईल. विद्यापीठातले पोटार्थी प्राध्यापक आणि विकत घेतलेले पत्रकार त्यांना साथ देतील. म्हणून लेखक जर दुरितांचे तिमीर जावो या भावनेने त्याला जाणवलेले सत्य कलापूर्ण स्वरुपात मांडत असेल, तर 'जो जे वांछील तो ते लाहो' च्या ठिकाणी 'जो जे वांछील तो ते लिहो' अशी आपली धारणा पाहिजे. माणसाच्या सुकृती इतकीच माणासातली विकृती हे ही एक सत्य आहे. अश्या विकृतीची चित्रे साहित्यात आता ह्या विज्ञानयुगात येणं अपरिहार्य आहे. वैज्ञानिक बुद्धीला आपल्या चुका कबूल करायला संकोच वाटत नाही. पण जो जे वांछील तो ते लिहो म्हटल्यावर लगेच आपल्यापुढे माणसांच्या वासना चाळवणारे त्यांच्यातल्या द्वेषभावनांना प्रोत्साहन देणारे असे लिखाण उद्या अधिकाधिक प्रमाणात लिहिले गेले तर त्याचे काय करायचे? हा प्रश्न उभा राहिल ! हे लेखक समाज रसातळाला नेणारे लेखन करतील या भितीचा बागुलबुवा उभा करुनच सरकार सेंसॉर बोर्ड वगैरे स्थापन करीत असते. आणि संस्कृतीसंरक्षणाचा झेंडा घेऊन स्वत:ची संस्कृती तीच खरी संस्कृती असे मानणारे लोक अस्तन्या वर करुन पुढे सरसावतात. साहित्याने पिढी बिघडवण्याची भाषा तर प्रत्येक पिढीत चालू आहे. मार्क ट्वेन ह्या विनोदी लेखकाचे यंग टॉम सॉयर हे शाळकरी वयातल्या पोरांच्या खोडकर लिलांचे अतिशय मजेदार दर्शन घडविणारे पुस्तक आहे. ते वाचून मुले बिघडतील म्हणून अमेरिकेतल्या एक-दोन संस्थानांतल्या संस्कृतीसंरक्षक सरकारांनी त्यांच्यावर बंदी आणली होती. इंग्लिश संस्कृतीसंरक्षकांनी शॉ च्या पिग्मॅलियन नाटकात नुसता डॅम हा शब्द आल्यामुळे सगळी संस्कृती रसातळाला चालली आहे असे समजून नाटक करणाऱ्यांना किती छळले यावर एक ग्रंथ लिहिला गेला आहे. मराठी भाषेत एके काळी संततिनियमन हा शब्द मोठ्याने उच्चारायची भिती होती. त्यासाठी शकुंतलाबाई परांजपे आणि र. धो. कर्वे यांचा किती छळ झाला होता! आता प्राथमिक शाळांच्या भिंतीवर आतल्या बाजूने शिवाजी महाराजांचा फोटो असतो आणि बाहेरच्या बाजूला निरोधची सरकारी जाहिरात असते. म्हणजे एका बाजूला इतिहासाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला भविष्य सुखाचा जावो म्हणून दिलेला सावधगिरीचा इशारा! आता छत्रपतींच्या मुळे मुलांच्यातली नुसतीच पूर्वजपूजा वाढेल म्हणून ती तसबीर काढून टाकायची की संततीप्रतिबंधक उपायांचे ज्ञान फार लवकर झाले तर पोरांची निती बिघडेल म्हणून जाहिरातीवर डांबर फासायचे? दोन्ही करण्याची आवश्यकता नाही. भिंतीच्या या दोन्ही बाजू सुबुद्धपणाने पहाता कशा येतील याची दृष्टी समजाला मिळणे हे इथे आवश्यक आहे.,[१]
  • राहता राहिला प्रश्न तो स्वातंत्र्याचा स्वैराचार होण्याच्या शक्यतेचा. हा धोका नक्कीच आहे. हा धोका टाळण्यासाठी काही विषयांवर बंदी घालणे; काही भाषेस आक्षेप घेणे; एखाद्या संघटनेने दायित्व स्वीकारणे; एका सेन्सॉर बोर्डाने यासाठी काम करणे असे प्रकार आहेतच. तत्त्व म्हणून हे मान्य होण्यासारखे आहे. पण एकदा का हे तत्त्व म्हणून स्वीकार केले की कोठे थांबायचे हे समजू शकत नाही. ज्यांनी तत्त्व म्हणून हा विषय तारतम्याने मांडला ते कदाचित योग्य ती दिशा दाखवतील देखील. परंतु दुर्दैवाने बऱ्याचदा गोष्टी त्यांच्या हातात राहत नाहीत. वाघावर स्वार होता येते, पण उतरता येत नाही. अतिरेकी बंधने, सूत्रांचे कर्मठ अर्थ, फतवे यांच्यामध्ये हे मूळ तत्त्व गुरफटून जाते. टोकाच्या भूमिका लादणारे सत्यानाशच करून टाकतात असे दिसते. हिंदू धर्म यांस अपवाद राहील असा आशावाद, युक्तिवाद केला जातो. पण दुर्दैवाने तोही तितकासा खरा नाही. एकूणच नियंत्रणातून मिळणारे फायदे काही असलेच तर तुलनेने खूपच अल्पायुषी आहेत.[२]
    • manogat प्रेषक एकलव्य (रवि., १४/०५/२००६ - १७:४६)] page as seen on 29 June 2010


सोवळ्यातलं सेन्सॉर बोर्ड

Aug 17, 2014, 12.00AM IST [३]


  • जे लोकांना आवडणार नाही, आक्षेपार्ह वाटेल ते लोक बघणार नाहीत. पण त्या नाटकावरच बंदी आणा, असं सांगणारं सेन्सॉर बोर्ड कोण? जयंत पवार


  • रंगभूमी ही पवित्र जागा असून तिचं मांगल्य जपलं पाहिजे, अशी चुकीची धारणा पूर्वापार नाटक करणाऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे. वास्तविक कलेच्या क्षेत्रात मंगल, पवित्र या मूल्यांना काही थारा नाही. किंबहुना या मूल्यांच्या अतिरेकामुळे कलेच्या वाढीलाच धोका पोचतो. कला ही सत्याचा सौंदर्याच्या अंगाने शोध घेते. तिथे शिव या तत्त्वाचा उपयोग नसतो. पण हे न उमगल्याने (वा मान्य नसल्याने) अनेक सदस्य स्वयंघोषित नीतिरक्षक बनतात आणि 'मोराल पोलिसिंग' करू लागतात. त्यांना हा आपला सरकारदत्त अधिकार वाटतो आणि हट्टाग्रहातून येणाऱ्या गंडापायी ते नाट्यसंहितांवर कात्री चावलून आपल्या हिंसक कृतीचं समर्थन करत राहतात. यात अनेक कलावंत असतात, जे अडाणीपणातून कलेच्याच मुळावर येतात. याचा फटका नाट्यकृतीकडे गंभीरपणे पाहणाऱ्या लेखक-कलावंतांनाच होतो.


  • नाटकातली शिवराळ वा तथाकथित अशिष्ट भाषा सेन्सॉर बोर्डाला खटकत असेल तर बोर्डाच्या संवेदनशीलतेत आणि समजशक्तीत काहीतरी कमतरता आहे, असं समजायला हवं. प्रमाणभाषेची बंधनं झुगारून विविध समाजगट आपल्या अस्सल भाषेतून आपले अनुभव साहित्यातून, नाटक आणि चित्रपटातून व्यक्त करू लागल्यालाही आता बराच काळ झाला आहे. हे साहित्य आणि कला समाजही एका समजदारीने पचवतो आहे. ही भाषा व्यक्त करण्यामागची कळकळ, प्रामाणिकपणा आणि ती मांडणाऱ्याचा कलेमागचा हेतू तपासला पाहिजे. त्यात अस्सलपणा असेल तर कुठलीच गोष्ट कुणालाही खटकण्याचं प्रयोजनच उरत नाही. सर्वसाधारण समाजाला तो अनुभव, ती भाषा परकी असेल तर ती स्वीकारून प्रगल्भ होण्याची शहाणीव समाजापाशी असते, यावर विश्वास ठेवला पाहिजे. नाटक करणाऱ्याला त्याच्या भाषेत बोलू द्या, तुमचे आग्रह वा सक्ती त्याच्यावर लादू नका, असं आता सरकारनेच आपल्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांना सांगण्याची गरज निर्माण झाली आहे.

संदर्भ

  1. पु.ल. देशपांडे 'इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४: अध्यक्षीय भाषणातून
  2. manogat प्रेषक एकलव्य (रवि., १४/०५/२००६ - १७:४६) page as seen on 29 June 2010
  3. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/40317428.cms


विकिक्वोट
विकिक्वोट
Look up परिनिरीक्षण in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
परिनिरीक्षण हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा

साचा:Wiktionary